आपला जिल्हा

करोडो रुपयाचा बोगस काम,योगाजी कुडवे यांचा आत्मदहनाचा इशारा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यातील करोडो रुपयाचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध होऊन २३ अधिकारी व ग्रामसेवक वर अद्याप कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यातील करोडो रुपयाचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्या संदर्भात तक्रार  सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केली होती. याची गंभीर दखल  मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांनी 6 सदस्यीय समिति गठित केली.  चौकशी समितिने प्रत्यक्ष कामावर जाऊन चौकशी केली, त्यानुसार वरील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन पंचायत समितीचे एकूण  २३ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.

भामरागड पंचायत समितीतील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी,शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी(tp.o ). व बोटनफुंडी ग्रा. पं. सचिव, इरूपडूम्मे ग्रा. पं. सचिव, मडवेली ग्रा. पं. सचिव, मन्नेराजाराम ग्रा. पं. सचिव, येचली ग्रा. पं. सचिव व पल्ली ग्रा. पं. सचिव असे 6 ग्रामसेवक असे एकूण 10 अधिकारी/कर्मचारी दोषी आढळलेले आहेत. 

अहेरी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी (tpo ), व उमानुर ग्रा. पं. चे ग्रामसेवक असे एकूण 5 अधिकारी/कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.

मुलचेरा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी, (tpo )व विवेकानंदपुर ग्रा. पं. चे सचिव, सुंदरनगर ग्रा. पं. चे सचिव, शांतीग्राम ग्रा. पं चे सचिव, येल्ला ग्रा. पं. चे सचिव, असे एकूण 08 अधिकारी-कर्मचारी दोषी आढळलेले आहेत. असे असतांना आजपर्यन्त यास जबाबदार अधिकारी -कर्मचारी यांचेवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा दुरुपयोग होत आहे, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. यास शासन – प्रशासन जबाबदार आहे, दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करून सर्वांवर फौजदारी गुन्हे नोंद करा. या मागणी करीता दिनांक. 27/03/2023 पासून जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या धरणा आंदोलन सुरू आहे, आज आंदोलनाचा 15 वा दिवस होता.

या रास्त मागणी करिता आंदोलन सुरू असताना सुद्धा शासन- प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे, सदर भ्रष्टाचारात जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे हित संबंध असल्याचे नाकारता येत नाही ? त्यामुळेच आंदोलनाला 15 दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा आंदोलनास कोणत्याही अधिकारी यांनी भेट दिलेली नाही.

त्यामुळे आंदोलनकर्ते आज पासून आमरण उपोषण, दिनांक ११ एप्रिल ला मुंडन आंदोलन, १२ एप्रिल ला भीक मांगो आंदोलन, १३ एप्रिल ला घंटानाद आंदोलन व आणि १४ एप्रिल ला आत्मदहन आंदोलन करून शासन-प्रशासनाचा निषेध करणार आहोत, यास शासन-प्रशासन जबाबदार राहील.

 

चौकशी समितीने केलेल्या चौकशी अहवाल नुसार दोषी आढळणाऱ्या भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यातील दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर तात्काळ बडतर्फ ची कार्यवाही करून सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही, तो पर्यन्त आंदोलन सुरू राहणार  असल्याची माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.

या पत्रकार परिषद ला सामाजिक कार्यकर्ते योगाजी. पांडुरंग कुडवे आंबेशिवणी, धनंजय डोईजड,कुरखेडा,चंद्रशेखर शिडाम सावरगाव,नीलकंठ संदोकर पोर्ला,रवींद्र सेलोटे पोर्ला  आदी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker