आपला जिल्हासामाजीक
चला जाणु या नदीला अंतर्गत गढ़चिरोली जिल्हातील कामाला सुरुवात

गडचिरोली,प्रतिनिधी :-
“चला जाणुया नदीला” परियोजना चा कामाचा विकासासाठी अंतरराष्ट्रीय जलपुरुष राजेन्द्र सिंह जी आणि महाराष्ट्र तील वरिष्ठाकडून माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या सोबत विशेष चर्चा नंतर माननीय राज्यपाल चा शासनाला दिलेले पत्राच्या अनुषगांने गढ़चिरोली जिल्ह्याच्या तीन ही नदी चा नदी प्रहरी ने सुध्दा दख़ल घेतलेले आहे.
त्यानुषंगाने आज गोड़वाना विघापीठ गडचिरोली च्या कुलगुरू माननीय श्री डॉ प्रशांत बोकारे साहेबासोबत विशेष बैठक घेतले. या बैठकीत नदीचा महत्व आणि जिल्ह्याच्या समस्या तसेच योजना व माहिती बाबत
विस्तृत चर्चा करण्यात आले. सदर बैठकीत खोब्रागडी नदीचे नदी प्रहरी डॉ सतिश गोगुलवार, पोहार /पोटफोड़ी/ नदीचे नदी प्रहरी विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार तसेच कठाणी नदीचे नदी प्रहरी मनोहरराव हेपट या तीन ही नदी प्रहरी मिळवून तीन ही नदी चा चला जाणुया नदीला संवाद यात्रा नंतर तीन ही नदीचा विस्तृत प्रकल्प प्रस्तावाचा (डीपीआर) बनविण्यासाठी विघापीठ आणि शैक्षणिक शाळा / महाविद्यालयाचा योगदान ची अपेक्षा करित विघापीठाचा सहकार्याची अपेक्षा करण्यात आले. त्यानुषंगाने गोड़वाना विघापीठ गडचिरोली च्या कुलगुरू माननीय डॉ प्रशांत बोकारे यांनी पुर्णपणे सहकार्य करण्याची हमी देत वरील तीन ही नदी करिता वेगवेगळे पीएचडी धारक प्राध्यापकांना आदेश दिले आणि त्या आजपासून कामाचा सुरूवात केलेले आहे. यात विघापीठातील प्राध्यापक डॉ धैर्यशील खामकर आणि प्राध्यापक डॉ महेंद्र वर्धलवार सहभागी झालेले आहे.




