ताज्या घडामोडी
ओबीसी हक्कांसाठी ‘मंडल यात्रा’ गडचिरोलीत दाखल – मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यात्रा काढावी : राज राजापूरकर
महिलांचा “एक राखी मंडल के लिये”चा भावनिक संदेश

गडचिरोली, प्रतिनिधी :
ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी लढा पुन्हा पेटला आहे. ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथून ऐतिहासिक मंडल यात्रा सुरू झाली असून, आज ती गडचिरोलीत दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेने गामा येथे पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले.
राजापूरकर म्हणाले –
“एकेकाळी मंडल आयोगाच्या अहवालाच्या विरोधात भाजपने ‘कुमंडल यात्रा’ काढली आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास देश विसरलेला नाही. आज परिस्थिती बदलली आहे. जर खरोखरच ओबीसींच्या न्यायासाठी उभे राहायचे असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंडल यात्रा काढावी, आणि जनतेसमोर प्रामाणिकपणे भूमिका स्पष्ट करावी.”



