आरमोरी,प्रतिनिधी :-
तांदूळ तेल पीठ पनीर या रोजच्या खाण्याच्या वस्तू वर जी एस टी ( कर) लाऊन महगाई वाढवणाऱ्या भाजप सरकारचा शिवसेनेनं केला निषेध.येत्या निवडणुकीत भाजप चा खरा चेहरा समोर आणणार असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला आहे.
देशात मोदीजी आणिभाजप ने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अच्छे दीन आने वाले है असे स्वप्न, आमिष दाखवून व मोठया मोठ्या गोष्टी, भाषण झोडून केंद्रात निवडून आले, नंतर दुसऱ्या टर्म ला पण निवडून आले,जनतेला वाटले अच्छे दीन येणार पण अच्छे दीन तर दूर राहिले. परंतु बुरे दीन सुरू केले, हळू हळू महागाई वाढविण्यास सुरवात केली, गॅस पेट्रोल, डिझेल, रॉकेल, जिवण्यावशक वस्तू चे असे भाव वाढविले की साधारण गरीब लोकांचे जगणे मुश्किल केले, आता तर मोदी भाजप सरकारने रोजच्या खाण्या पिण्याच्या वस्तू तांदूळ, तेल, दही, पनीर, या वस्तू वर जी एस टी ( कर) लावून दुपटीने महागाई वाढविली, म्हणजे गरीब सर्व साधारण लोकाना जीवनातून उठविण्याचा प्रकार आहे.
महागाई रोजच्या खाण्या पिण्यावर कर लावणे या वर भाजप चे खासदार आमदार, भाजप चे नेते काहीच बोलून राहिले नाही ,नेहमी रस्त्यावर उतरून निषेध करणारे आता गप्प बसून आहेत, भाजप च्या आमदारांनो खासदारांनो नेत्यांनो कुठे आहेत अछे दीन महागाई वाढवून जनतेला फसविनार्या केंद्र सरकार चा भाजप चा शिवसेना निषेध करीत आहे, येत्या निवडणुकीत भाजप चा असली चेहरा समोर आणणार असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia