आपला जिल्हाक्राईम

शेतकऱ्याची आत्महत्या — अतिवृष्टी व रेल्वे प्रकल्पामुळे झालेले नुकसान ठरले कारण?

आरमोरी, प्रतिनिधी :-

आरमोरी तालुक्यातील मौजा इंजेवारी येथील गजानन नामदेव लाकडे (वय ५५) या शेतकऱ्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाकडे यांच्याकडे असलेली काही शेती रेल्वे प्रकल्पासाठी संपादित झाली होती. त्यानंतर उरलेल्या शेतीवर त्यांनी कसब केले, मात्र अलीकडच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे — विशेषतः धानाचे — मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आर्थिक संकटामुळे ते काही दिवस मानसिक तणावात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गजानन लाकडे यांच्या मागे पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी आणि आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यात यावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker