महाराष्ट्र
बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर

मुंबई,प्रतिनिधी:-
भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यात आपले जाळे विस्तारत आहे. त्या पार्श्वभूमी राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला असून नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील सोशल मीडिया प्रभारी, महाराष्ट्र मिडिया समन्वयक, विभागीय व जिल्हा समन्वयक यांची नियुक्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती भारत राष्ट्र समितीचे सोशल मीडियाचे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी दिली आहे. आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार हा आमचा निर्धार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी सोशल मीडिया राज्य प्रभारी उदयराव घाटगे, सोशल मीडिया समन्वयक शशिकांत ससाणे व चिन्मय जोशी तर सोशल मीडिया सदस्य म्हणून प्रकाश चव्हाण, राहुल कोळसे, प्रशांत नवगिरे, निखिल राखोंडे, गौरव इंगळे, योगेश राठोड, गुरुप्रसाद सावंत यांचा समावेश आहे. तसेच, विभागीय सोशल मीडिया प्रसारक म्हणून मराठवाडा तून अशोक विधाते, उत्तर महाराष्ट्र प्रकाश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र सुशांत कांबळे, अमरावती विभाग गणेश कपाटे , नागपूर विभाग आकाश सुखदेवे , मुंबई विभागा करीता महेंद्र कणसे व रवींद्र रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जाळे तयार करणार – जयंत देशमुख
बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी जयंत देशमुख यांनी सांगितले की, आम्ही सर्व सोशल मीडिया नियुक्ती केली आहे.आता प्रत्येक घराघरात पक्षाचे नाव पोहोचले आहे. यासाठी घराघरात नाव पोहोचले की तेलंगणाचे विकसीत मॉडेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी आठ ते नऊ वर्षांत जे काम केले आहे त्यांची चर्चा महाराष्ट्रात आहे.येत्या काळात सोशल मीडिया माध्यमातून आम्ही महाराष्ट्र बरोबर संपूर्ण देशभर जाळे तयार करून त्याचप्रमाणे देशात सरकार बनविण्यासाठी तयार होत आहे असे देशमुख यांनी सांगितले.



