आपला जिल्हाताज्या घडामोडी

नगरसेवकावर फसवणुकीचा आरोप, कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चामोर्शी येथील काही महिलांनी नगरसेवक आशीष अरुण पिपरे व त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे यांच्यावर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पीडित महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, २०२० मध्ये स्वयंपूर्ण रोजगार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देत आशीष पिपरे यांनी सुमारे ४० महिलांना स्वतःच्या घरी बोलावून बैठका घेतल्या. अगरबत्ती निर्मिती प्रकल्पासाठी बँकेमार्फत कर्ज मंजूर करून देतो व कर्ज माफ करून देतो, असे सांगून प्रत्येक महिलेकडून अर्ज घेतल्याचा आरोप ऑल गडचिरोली मीडिया असोसिएशन च्या पत्रकार परिषद मध्ये करण्यात आला आहे.

या पत्रकार परिषद ला सौ. कविता दिलीप किरमे,सौ. मीनाक्षी देवराव पिपरे,सौ. देवांगना महेश गौतम,निवृत्ता प्रकाश गव्हारे,निहल्ला प्रकाश गृच्छारी,शीला पुरुषोत्तम धोडरे,एस पी धोडेरे,सौ. कविता रवी कारडे,सौ कविता रवि कारडे, सौ. सुषमा सतीश धोडरे, सौ. रेखा सुनील गव्हारे, सौ. छाया उमाजी बोदलकर,सौ. मेनू विनोद धोडरे, वेणू विनोद घोरे,सौ. अनिता गुणवंत पिपरे,सौ अनिता पिके,सौ. मनीषा योगेश्वर गव्हारे, सौ. सुषमा राजेश बुरांडे,सौ. सुषमा राजेश बुरोडे, सौ. अर्चना किशोर बुरांडे,सौ. शारदा बबन पिपरे,सौ. साधना बाळा धोडरे,सौ. एस, बी धोडरे, सौ. जयश्री रमेश पिपरे,सौ. वंदना सविंद्र कोठारे,सौ. अर्चना सुनील धोडरे,श्री. चंद्रशेखर हरिश्चंद्र मस्के,श्री. ओमदास कवडू झरकर, श्री. नितेश दत्तू पिपरे,श्री. मिलिंद नामदेव भांडेकर,सौ. आश्विनी धनराज गव्हारे आदी उपस्थित होते.

या सर्व महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खात्यात प्रतीकात्मक रक्कम जमा करून बँकेशी संगनमत साधून प्रत्येक लाभार्थ्याच्या नावावर अंदाजे १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर या कर्जातील मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून गुजरातमधील कंपनीकडून अगरबत्ती बनविण्याच्या मशीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मशीन महिलांना न देता स्वतःच्या ठिकाणी ठेवून मोठा प्रकल्प सुरू केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रकल्प सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच तो बंद पडल्याने महिलांना बँकेकडून कर्जफेडीच्या नोटिसा येऊ लागल्या. त्याबाबत महिलांनी पिपरे यांच्याकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा आरोपही महिलांनी केला आहे. या घटनेमुळे काही महिलांच्या कुटुंबात आर्थिक व मानसिक तणाव निर्माण झाला असून आत्महत्येच्या विचारांपर्यंत परिस्थिती पोहोचल्याचे महिलांनी निवेदनात म्हटले आहे.

पीडित महिलांनी यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन न्याय मागितला असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. तसेच न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर अनेक महिलांनी स्वाक्षऱ्या करून प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker