ताज्या घडामोडीदेश विदेश

बेपत्ता मुलांमागे देशव्यापी टोळीचा संशय; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला इशारा

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-

देशभरात वाढत असलेल्या मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला कठोर तपासाचे निर्देश दिले आहेत. या घटनांमागे देशव्यापी टोळी किंवा संघटित गट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणांमध्ये ठराविक पद्धत किंवा पॅटर्न आहे का, याचा शोध घेणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. देशातील सर्व राज्यांकडून बेपत्ता मुलांची माहिती एकत्र करून संपूर्ण चित्र समोर आणण्याचे आदेश केंद्राला देण्यात आले आहेत.

तसेच, शोधून काढलेल्या मुलांची सविस्तर मुलाखत घेऊन या घटनांमागील कारणे, जबाबदार व्यक्ती किंवा टोळ्यांचा मागोवा घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत असताना, केंद्र आणि राज्य यंत्रणांनी समन्वय साधून प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker