आपला जिल्हाताज्या घडामोडी

रिमझिम पावसाने गडचिरोलीकरांना दिलासा; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहर व परिसरात काल रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान झालेल्या रिमझिम पावसामुळे नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने गारव्याची सुखद अनुभूती दिली.

काल सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह वादळी वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर रात्री पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. मात्र वादळी वाऱ्यांमुळे गडचिरोली-आरमोरी मार्गावरील अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, आज सकाळी सुमारे ७ वाजता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पडलेल्या झाडांची पाहणी केली. त्यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ सूचना देत रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

आमदार डॉ. नरोटे यांच्या तत्पर हस्तक्षेपानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत रस्त्यावर पडलेली झाडे हटविली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली असून वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अचानक आलेल्या वादळ-पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker