ताज्या घडामोडीदेश विदेश

TET -सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हलफनामा दाखल करण्याचा आदेश

नवी दिल्ली,प्रतिनिधी :-

सर्वोच्च न्यायालय ने माध्यमिक वर्ग (इयत्ता ९ ते १२) शिकवणाऱ्या विशेष शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य आहे का, याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागवला आहे. तसेच कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता व सेवा अटींबाबत पूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी एका महिन्याच्या आत करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अमिकस क्युरी ऋषी मल्होत्रा तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीरराघवन आणि मनीष सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

केंद्र सरकारकडून मागवलेले स्पष्टीकरण

न्यायालयाने केंद्र सरकारला पुढील मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे:

  • इयत्ता ९ ते १२ (माध्यमिक स्तर) साठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का?

  • १० जून २०२२ रोजीच्या शिक्षण मंत्रालयाच्या पत्रातील भरती प्रक्रिया फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकेंडरी या सर्व स्तरांवर लागू होते का?

  • २०१० नंतर केंद्र किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र TET परीक्षा घेतली आहे का?

न्यायालयाचे निरीक्षण:-

सुनावणीदरम्यान ASG भाटी यांनी सर्व शिक्षकांसाठी, त्यात माध्यमिक वर्गातील शिक्षकांचाही समावेश आहे, TET अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच Rehabilitation Council of India (RCI) चे प्रमाणपत्रही आवश्यक असल्याचे नमूद केले.

मात्र न्यायमूर्ती दत्ता यांनी २०२१ मधील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्या निर्णयात ‘समग्र शिक्षा’ योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. त्यात इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ साठी TET अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद होते; मात्र ९ ते १२ साठी असा उल्लेख नव्हता.

न्यायालयाने विचारले, “जर मार्गदर्शक तत्त्वांत ९ आणि १० वीचा स्पष्ट उल्लेख नाही, तर आता ते अनिवार्य कसे म्हणता येईल? केवळ एखाद्या पत्राद्वारे नियम बदलता येणार नाहीत. त्यासाठी कायद्यात किंवा नियमांमध्ये स्पष्ट तरतूद असावी.”

अमिकस क्युरींची भूमिका:-

अमिकस क्युरी यांनी असा युक्तिवाद केला की २०२२ च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांत ‘एज्युकेटर’ हा शब्द इयत्ता १-५ आणि ६-८ साठी वापरण्यात आला आहे; मात्र ९-१२ साठी नाही. त्यामुळे एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संबंधित अपंगत्व क्षेत्रातील पात्रता पुरेशी ठरू शकते, असे त्यांनी सूचित केले. विशेषतः सेवाशेवटच्या टप्प्यावर असलेल्या कंत्राटी शिक्षकांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.

कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत आदेश:-

हस्तक्षेपकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील वीरराघवन यांनी सांगितले की, २०२२ मधील न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता आणि सेवा अटींबाबत कोणत्याही राज्याने पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. यावर खंडपीठाने सर्व राज्य सरकारांना एका महिन्याच्या आत हलफनामा सादर करून २१ जुलै २०२२ च्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच मार्च २०२५ मधील आदेशातही हे निर्देश पुनरुच्चारित करण्यात आल्याचे नमूद केले.

प्रकरणाची पुढील सुनावणी केंद्र सरकारच्या हलफनाम्यानंतर होणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker