गडचिरोली,प्रतिनिधी :-
मान्सून तोंडावर असताना रस्ते व पुलांची कामे रखडल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या दोन स्वतंत्र नोटिसांमध्ये दोन महत्त्वाच्या प्रकल्पांतील दिरंगाईवर थेट बोट ठेवण्यात आले आहे.
मान्सूनपूर्वीच अपूर्ण कामांवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली ही कडक भूमिका नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. आता संबंधित विभागाने वेळेत काम पूर्ण करून प्रशासनाचा विश्वास परत मिळवणे गरजेचे आहे.
प्रमुख मुद्दे-
1) लाहेरी–बीनागुंडा मार्ग (भामरागड तालुका)
गुंडेन्नूर नाल्यावरील दोन पुलांचे काम १८ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे दोन वर्षांचा विलंब होऊनही काम अपूर्ण आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत ही बाब उघड झाली.
2) आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग
या मार्गाचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो, परिणामी मोठ्या गैरसोयी निर्माण होत आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाचा गंभीर मुद्दा-
नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, गडचिरोली जिल्हा हा घनदाट जंगल व नद्यांनी वेढलेला असल्याने पावसाळ्यात पुलांच्या अभावामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. विशेषतः बीनागुंडा परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
कठोर कारवाईचे संकेत-
ही नोटीस आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत (कलम ३०(२), ५५ व ५६) बजावण्यात आली आहे.
पुलांच्या कामाबाबत ५ मे २०२६ रोजी लेखी स्पष्टीकरण मागविण्यात आले
आलापल्ली–सिरोंचा मार्गाबाबत ६ मे २०२६ रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास फौजदारी कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सकारात्मक बाजू-
रखडलेली कामे वेगाने पूर्ण होण्याची शक्यता
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
प्रशासनातील जबाबदारी व पारदर्शकता वाढणार
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button