आरोग्य व शिक्षण

३६ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणीचा आनंद गगनात मावेना ….

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरात तब्बल ३६ वर्षांनी ५० च्या वर मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने त्यांचा    आनंद गगनात मावेना असा अभूतपूर्ण क्षण काल अनुवाभवास आला. प्रत्येक भेटीचा आयुष्यातून गेलेला क्षण त्यांनी आपल्या हृदयात साठून ठेवलेला होता तो कधीच परत येणार नाही असे वाटत असताना त्यांना तोच अनुभव आणि क्षण आणण्याच काम त्यांचे वर्गनायक उदय धकाते यांनी आयोजित केलेल्या मित्रोत्सव-१९८६-८७ हा अभूतपूर्ण अविस्मरणीय कार्यक्रम गडचिरोली वासियांनी अनुभवला.

गडचिरोलीमध्ये ४५ वर्षापूर्वी झालेली मैत्री १० वर्ष पर्यंत टिकली नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी  अलग झालेले ५० च्या वर मित्र-मैत्रिणी तब्बल ३६ वर्षा नंतर आज गडचिरोली शहरात एकत्र आले. हा अभूतपूर्ण क्षण आज शहरवासियांना अनुभवास आला आहे.

अत्यंत नियोजित पूर्व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती लीलाबाई पेंदाम,माजी उपशिक्षणाधिकारी राजनहीरे, सेवानिवृत्त शिक्षक आयलावर,सेवानिवृत्त शिपाई श्रीमती गाठे बाई, सेवानिवृत्त शिपाई जुनघरे, जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक चंदनगीरीवार,वर्गनायक उदय धकाते यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम सरस्वती व दीप पूजन सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका श्रीमती लीलाबाई पेंदाम यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी  जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोलीचे सभागृह रांगोळी आणि फुलांनी सजविण्यात आले होते,हे विशेष.मित्र-मैत्रिणींचा सुंदर परिचय चा कार्यक्रम घेण्यात आला.प्रत्येकास स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. जुन्या काळातील शिक्षक-शिक्षिका,चपराशी यांना भेटून माजी विद्यार्थी हे आनंदित झाले. विद्यार्थी  सेवानिवृत्त  शिक्षिका व चपराशी हे  या शाळेतील ३६ वर्षाच्या भेटीने गहिवरले.

मित्रोत्सव-१९८६-८७ साजरा करण्यासाठी गुजरात,मध्यप्रदेश,छतीसगड,मुंबई,पुणे नागपूर आदी ठिकाणाहून  एकत्र आलेत..सदर कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पार पडले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गनायक उदय धकाते यांच्या मार्गदर्शनात अनेक समिती गठीत करण्यात आली होती. या करिता निमेश पटेल,उल्हास बाटवे, नितीन  भडंगे, अपर्णा रोटकर-देव,ममता कवठे-डांगे,धर्मेंद्र मुनघाटे, प्रकाश पंधरे, दमयंती धकाते-नंदुरकर, प्रतिभा खोब्रागडे-काळे,संगीता चन्नावार-इटकेलवार, गीता मगरे-ठाकरे, सुलभा जांभुळे-नारनवरे,सुनील पेंदोरकर, गीता गुरुनुले-लेनगुरे,शैलजा गारोडे-वनमाली,सुरेश पेंदाम, देवेंद्र सज्जनपवार,रवींद्र सूर्यवंशी,रमेश टेकाम,मुकुंद वाढइ,विद्या हजारे-कवठे,प्रज्ञा बागेसर-गायकवाड,अनुसया बावणे यांनी परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.