महाराष्ट्र
सेवानिवृत्तीचे सर्व अनुषंगिक लाभ विनाविलंब देण्यात यावे- उच्च न्यायालय
औरंगाबाद,प्रतिनिधी :-
मा. उच्च न्यायालय मुंबई चे औरंगाबाद खंडपीठाने अनेक वर्षांपासून वैधता प्रमाणपत्र प्रकरणी भाट, ब्रम्हभाट अशा नोंदिमुळे प्रचंड अडचणीत असलेल्या बागुल कुळातील समाज बांधवांना दिलासा देणारा न्यायनिर्णय ऐन दिवाळीच्या तोंडावर मिळवून दिला आहे.
धनंजय शरदचंद्र बागुल यांची याचिका क्र.८५१३/२२ मध्ये हा महत्वपूर्ण निकाल लागला आहे. नोंदीत भाट, ब्रम्हभाट असल्यातरी केवळ जुन्या नोंदी ठाकूर असलेले व रक्तनात्यात १६ वैधता प्रमाणपत्र असलेने मा. उच्च न्यायालया कडून वैधता प्रमाणपत्रासह सेवानिवृत्तीचे सर्व अनुषंगिक लाभ विनाविलंब देण्यात यावे असे आदेश दिलेत.
याचिका तर्फे ॲड.सुशांतजी येरमवार यांच्या अत्यंत कौशल्यपूर्ण युक्तिवादमुळे बागुल कुटुंब न्यायालयीन लढा जिंकला आहे.
मी व्यक्तिशः, आदिवासी ठाकूर जमात व विशेष करून सर्व बागुल कुटुंबीय मा. ॲड.येरमवार सरांचे आभारी आहोत.
वाचकांचा कौल