क्राईम

हरवलेले ७६ मोबाईल शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

गडचिरोली,प्रतिनिधी :-

हरवलेले मोबाईल शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले असून सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या 76 मोबाईल हे मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहे. मोबाईल मिळाल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

     तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असुन मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविले गेल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबधीत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.

मोबाईल हरविले किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलव्दारे सायबर गुन्हे घडण्याची जास्तीत जास्त शक्यता असल्यामुळे हरविले किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. सन 2022 या वर्षात एकुण 150 मोबाईल ज्यांची किंमत जवळपास 22 लाख रुपये एवढ्या किंमतीच्या मोबाईलचा शोध सायबर पोलीस स्टेशन मार्फत घेवुन ते मोबाईल संबंधीत व्यक्ती यांना देण्यात आले.

तसेच सन -2023 मध्ये एकुण 135 मोबाईलचे शोध घेण्यात आले असुन त्यांची अंदाजे किंमत एकुण 18,80,975/- रुपये एवढी आहे व दिनांक 18/09/2023 रोजी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते 64 मोबाईल संबधीत व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहे.

सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी  उल्हास भुसारी, पोउपनि निलेश वाघ व पोलीस अंमलदार नापोअं/1086श्रीनीवास संगोजी, मनापोअं/638 वर्षा वहिरवार, मनापोअं/2918 संगणी दुर्गे, मनापोअं/गायत्री नैताम, मपोअं/किरण रोहणकर, पोअं/5553 योगेश खोब्रागडे, पोअं/सचिन नैताम यांनी पार पाडली.

 पोलीस अधीक्षक  नीलोत्पल  यांनी जनतेला आवाहन केले आहे की, सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. त्यामुळे जनतेनी सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे व मोबाईल चोरी झाला असेल तर, तात्काळ ड़ड्ढत्द्ध.ढ़दृध्.त्द या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी.  तसेच आपला ऑनलाईन आर्थिक फ्रॉड झाला असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी.  यासोबतच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलीसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.