गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात भाजपने आपला उमेदवार विद्यमान खासदार अशोक नेते यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. ते तिसर्यांदा निवडणूक येतात काय या बाबत मतदारांमध्ये उत्सुकता लागली आहे.
कॉंग्रेस ने आपला उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवार केले आहे. या क्षेत्रात आता मुख्य लढत हि भाजप कॉंग्रेस यांच्यात होणार आहे. या क्षेत्रात महायुतीने आपला दावा ठोकला होता.परंतु धर्मराव आत्राम यांचे प्रयत्न हे निष्पळ ठरले आहे. मागील काही वर्षापासून ते खासदार्कीचे स्वप्न बघत होते.परंतु भाजपने हि आपली परंपरागजागा सोडली नाही. याचे सर्व श्रेय खासदार अशोक नेते यांना जाते.
गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात खासदार अशोक नेते यांनी मागील पंधरा वर्षापासून दांडगा संपर्क भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांशी ठेवल्यामुळे त्यांचे हजारो कार्यकर्ते अशोक नेते यांनाच उमेदवार करावी अशी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेला अखेर यश मिळाले असून भाजप या निवडणुकीत हि जागा राखून मोठा विजय मिळवून हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून देशात ओळखला जावा यासाठी काम करणार आहे.
वाचकांचा कौल